Gandhi Bharatat Yenyapurvi : Ramchandra Guha
• १८९३ साली मोहनदास गांधींनी दक्षिण आफ्रिकेसाठी प्रस्थान ठेवले त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. तिथे त्यांनी जी दोन दशके घालवली त्यातून एक महात्मा घडला. या चरित्रग्रंथातून रामचंद्र गुहा असे प्रतिपादन करतात, की गांधींच्या सर्व संकल्पनांना १९१५ साली भारतात परतण्यापूर्वी इथे आकार प्राप्त झाला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी जो काळ व्यतीत केला त्यातूनच त्यांना साम्राज्यवाद आणि वंशवादाचे आकलन झाले. दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारी आणि अखेरीस ब्रिटिश साम्राज्य नेस्तनाबूत करणारे तत्त्वज्ञान आणि डावपेच परजून तयार केले.
रामचंद्र गुहांनी या ग्रंथनिमिर्तीसाठी चार खंडांमधून विखुरलेल्या समृद्ध संदर्भ साहित्याचा आणि ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल अभ्यास व संशोधन केले. त्यातून गांधींचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर साकार होते. गांधींचे जग गुजराथच्या किनारपट्टीवरची संस्कृती आणि समाज तसेच व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्लंड आणि वसाहातिक दक्षिण आफ्रिकेतील जीवन किती भिन्न होते याचेही दर्शन आपल्याला घडते. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात असलेल्या टॉलस्टॉय आणि शाकाहार यांसारख्या संकल्पनांसंदर्भात त्यांनी केलेले प्रयोगही आपल्यासमोर रामचंद्र गुहा उलगडून दाखवितात. क्रांतिकारक ज्यू. नानाविध प्रकारचे ख्रिश्चन आणि धर्मनिष्ठ मुस्लीम यांच्याशी गांधींची घनिष्ठ मैत्री होती; त्यांना अनेक प्रतिस्पर्धी आणि शत्रूही होते. पती आणि पिता म्हणून त्यांच्या पदरी पडलेले अपयश… या सान्यांचे विश्लेषण गुहा इथे करतात. त्यांनी लाखो लोकांना कशी प्रेरणा दिली आणि वर्ग, जात, धर्म या साऱ्यांना ओलांडून त्यांना अहिंसेच्या मार्गाने अत्यंत दुष्ट व रानटी वंशवादाशी राजवटीशी सामना देण्याचे धैर्य गांधींनी दिले.
सखोल अभ्यास व संशोधन, तसंच ओघवती कथनशैली यामुळेच आपल्या
भारताच्या या महान सुपुत्राचे जीवनकळायला मदत होते.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.