Maharastracha Bhugol Vitthal Pungale महाराष्ट्राचा भूगोल विठ्ठल पुंगळे
लेखक : विठ्ठल पुंगळे प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन
दोन शब्द…
भूगोल या विषयात पृथ्वीशी संबंधित वेगवेगळ्यटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो भूगोलाच्या अभ्यासाने एखाद्या प्रदेशातील मानवी जीवन वनस्पती जीवन व प्राणी जीवनातील स्थित्यंतर समजण्यास मदत होते, या स्थित्यंतराचे होणारे परीणाम व त्यावरील उपाययोजनासाठी भूगोलाचा अभ्यास गरजेचा ठरतो. भूगर्भ रचनेत होणारे बदल, लोक संरचनेत होत असलेले बदल, हरितक्रांतीने कृषी पीक पद्धतीत होत आलेले बदल, नवीन संशोधन व अवकाश कार्यक्रम – उद्योगात होणारे बदल मानवाच्या जीवनाला गती मिळवुन देण्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहेत त्यामुळे मानवी जीवनाची तसेच ज्ञानाची कक्षा रुंदावली आहे. मानवाचे आर्थिक जीवनमान व आरोग्याचा दर्जा उंचावत आहे. जगभरात सांस्कृतिक व वैचारिक देवाणवाण वाढत आहे. मानवाने आपल्या हव्यासापोटी अनिबंध संसाधनाचा केलेला वापर व त्यामुळे होणाऱ्या फायद्या इतकेच निर्माण होणारे
नवीन प्रश्न मग ते भूप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण असो या सर्व प्रदुषणामुळे जगभरातील वातावरणात होणारे
हानीकारक बदल मानवाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक संसाधनांचा वापर करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे मानवाची गती व दूर्गती/अधोगती यातील सिमारेषा मानवाला भूगोलाच्या अभ्यासाने स्पष्ट करता येते. यातून
कृषीविकास, उद्योगविकास, लोकसंख्या, वाहतूक यांचे होणारे फायदे-तोटे भूगोलाच्या अभ्यासाद्वारे ज्ञात करता येतात. एखाद्या प्रदेशातील भूरूपाचा तेथील मानवी जीवन, वनस्पती व प्राणी जीवनावर प्रभाव पडतो. त्या भूप्रदेशाला व हवामानाला अनुसरून मानव आपली जीवनपद्धती विकसीत करत आलेला आहे, ह्याचे ज्ञान भूगोलामुळे होते.. आजच्या स्पर्धात्मक युगात आयोगाने बदललेला परीक्षेचा नवीन पॅटर्न व त्यात भूगोल विषयाचे वाढते वर्चस्व हेच अधोरेखीत करते की, प्रत्येकाला आपआपल्या भूप्रदेशाची व समस्याची माहिती असावी व त्या सोडविण्यासाठी उपाययोजना अवलंबविता याव्यात. MPSC (राज्यसेवा), PSI, STI, ASST, सरळसेवा, खात्यांतर्गत परिक्षा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी
कार्यालय, पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेला महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर सरासरी १० ते १५ प्रश्न विचारले
जातात. प्रश्नाचे स्वरूप पाहुन या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर दिवसेंदिवस विविध स्पर्धा परिक्षेत वाढत असलेली प्रश्नांची संख्या या विषयाचा प्रभाव स्पष्ट करतात. या पुस्तकाद्वारे अद्ययावत आकडेवारी, प्रत्येक मुद्यावर तक्ता, तुलनात्मक माहिती व नकाशाद्वारे माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत त्या विषयातील मुलभूत संकल्पना समजतील व जास्तीत जास्त मार्कस् मिळवता येतील. या पुस्तकात सध्याच्या परिक्षेतील प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा विचार करून जास्तीत जास्त विस्तृत व सुटसुटीत माहिती देण्यात आलेली आहे, या पुस्तकाचा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही,
विठ्ठल विनायकराव पुंगळे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.