

Mulbhut Samajshastriy Vichar Paschatya Aani Bharatiy ( Foundations Of Sociological Thought ) (Marathi) Dr.Pradeep Aglave,Dr.Saroja Aglave
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Author : Dr.Pradeep Aglave,Dr.Saroja Aglave
Edition :
Language : Marathi
Publisher: : Shree Sainath Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Mulbhut Samajshastriy Vichar Paschatya Aani Bharatiy ( Foundations Of Sociological Thought ) (Marathi) Dr.Pradeep Aglave
डॉ. प्रदीप आगलावे हे समाजशास्त्राचे सुप्रसिद्ध लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. ते एक चिंतनशील लेखक, विचारवंत, अभ्यासक आणि वक्ते आहेत. समाजशास्त्र आणि आंबेडकर विचारांचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी समजाशास्त्र या विषयाच्या संदर्भात अनेक पुस्तके लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्वच पुस्तकांना प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ‘समाजशास्त्रज्ञ डॉ. आंबेडकर’ आणि इतर काही ग्रंथांचा हिंदी अनुवाद दिल्लीवरून प्रकाशित झाला आहे. त्यांनी लोकमतमधून अनेक वर्ष विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाचे प्रमुख आणि डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध परिषदा आणि कार्यशाळांमधून आपले संशोधनपर पेपर सादर केले आहेत. त्यांती विविध परिषदांमधून अनेक व्याख्याने दिली आहेत. डॉ. आगलावे यानी समाजशास्त्र मराठी परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ लेखन पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा वैचारिक ग्रंथ पुरस्कार, मराठी साहित्य परिषद पुणे यांचा संशोधन ग्रंथ पुरस्कार, औरंगाबाद महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर संशोधन केंद्राचा लेखनव्रती पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. सरोज आगलावे या एम.ए. (समाजशास्त्र, मराठी) एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्या नागपूर येथील महिला महाविद्यालय, नंदनवन येथे समाजशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर आहेत. ‘जोतीराव फुले : सामाजिक तत्त्वज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ २०३ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाचा हिंदी अनुवाद दिल्ली येथील सम्यक प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट लेखनाचा वाङ्मय पुरस्कार २००३ मध्ये मिळाला. त्या अनाथपिंडीक महिला पत सहकारी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्या काही महिला संस्थांच्या पदाधिकारी आहेत. त्या फुले-आंबेडकरी विचारांच्या ज्येष्ठ अभ्यासिका आहेत. त्या उत्कृष्ट वक्त्यादेखील आहेत.
ation Books from SociologyAvailable at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.