Rajyashastra Iyatta : 12vi-राज्यशास्त्र इयत्ता : बारावी
बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इ.स.१९९१ पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे.
त्यात जगातील १९९१ पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या
संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्यांचा आपणास परिचय करून देण्यात आला आहे.
पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात
समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे
महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. या सर्व प्रश्नांकडे शासन कोणत्या भूमिकेतून
पाहते? त्याचे प्रतिबिंब आपणास ‘सुशासन’ या प्रकरणात पाहावयास मिळते. शेवटच्या प्रकरणात
भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा सर्वेक्षणात्मक आढावा घेतला आहे.
Reviews
There are no reviews yet.