Vijayavardhini Jijau Dr.Shrimant Kokate विजयवर्धिनी जिजाऊ डॉ.श्रीमंत कोकाटे
जिजाऊ या अत्यंत महत्त्वाकांक्षी होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे, ही त्यांची दुर्दम्य इच्छा होती, ती त्यांनी आपले शौर्यशाली पती शहाजीराजे, क्रांतिकारक पुत्र शिवाजीराजे, नातू संभाजीराजे आणि कोट्यवधी जनतेत निर्माण केली. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी अनेक संकटांवर मात केली. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, परंतु संकटसमयी त्या नाउमेद, निराश किंवा हतबल झाल्या नाहीत. त्या स्वतः शूर, पराक्रमी, लढवय्या आणि उत्तम राजनीतिज्ञ होत्या. त्या उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी अनेक न्यायनिवाडे केले.
जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची गरज असते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांना आपली भाषा, संस्कृती, भूमी यांचा प्रचंड अभिमान होता; परंतु अनिष्ट परंपरा त्यांनी निर्धाराने नाकारल्या. मोगलांपुढे हतबल झालेल्या जनतेत त्यांनी नवचैतन्य निर्माण केले. आपणदेखील लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम राज्यकारभार करू शकतो, ही स्फूर्ती त्यांनी भारतीयांमध्ये निर्माण केली. त्यामुळे जिजाऊ या भारतीयांच्या स्फूर्तिदात्री आहेत. जिजाऊ म्हणजे स्वराज्याचे प्रेरणापीठ, विद्यापीठ, ज्ञानपीठ आणि संस्कारपीठ आहेत.
– डॉ. श्रीमंत कोकाटे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.