Mrityunjaya Shivaji Sawant मृत्युंजय शिवाजी सावंत
लेखक : शिवाजी सावंत
कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं! ‘मृत्युंजय’ एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही.
भारताच्या राजकीय पुनरुत्थानाबरोबरच महाभारताचे आणि विशेषतः त्यातील प्रसंगांचे आणि व्यक्तिरेखांचे नव्या, व्यापक, मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले. कुंतीपुत्र राधेयाविषयी तर विशेष आस्था व्यक्त झाली आणि कुसुमाग्रजांच्या ‘कौंतेय’ सारख्या अनन्यसाधारण साहित्यकृतींचा लाभही मराठी साहित्याला याच आस्थेतून झाला.. ‘कौंतेय’ने नाट्यक्षेत्रात जी यशस्वी कामगिरी केली, त्यासारखी कामगिरी तशा यशस्वी तऱ्हेने कादंबरीच्या क्षेत्रात ‘मृत्युंजय’ ने केली आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे. ‘अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं,’ हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे, त्याच्या संघर्षात आणि पिचण्यातसुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली ‘जीवन’ सामावले आहे, हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे; मौनाच्या विलक्षण रूपांत! या मौनाच्याच जोरावर मृत्यूच्या महाद्वारातसु
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.