Why Bharat Matters (Marathi) विश्वमित्र भारत व्हाय भारत
हे जग केवळ कठोरच नाही तर अशांत आणि अंदाज न लावता येण्याजोगे आहे. कोविडचे परिणाम, युक्रेन आणि पश्चिम आशिया संघर्ष, हवामान बदलाच्या घटना, कट्टरतावाद आणि दहशतवाद यांवरून ते आत्ता ओळखले जाते. चीनचा उदय, अमेरिकेची बदलती भूमिका, रशियाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रभाव आणि नव्या तंत्रज्ञानाची ताकद यासारखी गुंतागुंतीची भूराजनीती तिथे कार्यरत आहे.
भारताला या वादळी समुद्रांमधून जागतिक सत्ता होण्यावरील आपले लक्ष ढळू न देता मार्गक्रमण करायचे आहे. ‘विश्वमित्र’ या नात्याने तो दक्षिण जगताच्या कल्याणाची आणि एकूणच जागतिक भल्यासाठी योगदान देण्याची कामना करत आहे. भारत जगाच्या मोजदादीमध्ये खूप महत्त्वाचा आहे, येणा-या जबाबदाऱ्या तसेच संधी स्वीकारायला सज्ज आहे. अमृतकाळामध्ये प्रवेश करताना एकीकडे त्याच्या मनात वृद्धी आणि विकासाच्या युगाची कल्पना आहे तर दुसरीकडे आपल्या परंपरा आणि वारशाशी निष्ठा राखण्याचाही मनोदय आहे.
विश्वमित्र भारत मध्ये एस. जयशंकर असे मत मांडतात की, विकसनशील राष्ट्र बहुतेक वेळा स्थैर्याची अपेक्षा करत असताना भारताने या तीव्र अनिश्चिततेच्या काळामध्ये स्वतः उन्नत होण्याची योजना आखायला हवी. ही प्रक्रिया फारच अनन्यसाधारण आहे कारण ती एका सभ्यतावादी राज्याचे पुनरुत्थान आहे. त्याचबरोबर ते या जागतिकीकरणाच्या युगात परराष्ट्र धोरण सर्वच नागरिकांसाठी त्यांच्या रोजच्या आयुष्यात उत्तरोत्तर कसे महत्त्वाचे आहे. हे सुद्धा स्पष्ट करतात. रामायणाच्या चश्म्यातून आपला दृष्टीकोन समोर ठेवत लेखक आजच्या परिस्थितीसाठी एक अभिनव भूमिका मांडतात.
भारत महत्त्वाचा आहे कारण तो ‘भारत’ आहे, हे दिवसेंदिवस स्पष्ट होत जाणारे वास्तव समजून घेण्यासाठी आणि त्यावर गांभीयनि चिंतन करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचले पाहिजे.
Available at Ksagar Book Centre www. ksagaronline.com call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.