मनोगत
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक विद्यार्थ्याच्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमात आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास या विषयास अत्यंत महत्त्व दिलेले आहे. इतिहास या विषयाचा अभ्यास करीत असताना अनेक विद्यार्थ्यांना हा विषय क्लिष्ट, गुंतागुंतीचा, तारखांची जंत्री असलेला
व कंटाळवाणा वाटतो. तसेच अनेक पुस्तकांत इतिहासाचा वेगवेगळा संदर्भ, वेगवेगळ्या तारखा यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकच गोंधळ उडतो, इतिहासाची कोणती पुस्तके वाचावित त्यातून किती प्रश्न विचारण्यात येतील याचीही शाश्वती नसते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा आवाका इतका मोठा आहे की एकच एक पुस्तक वाचून तो पूर्ण होणेही शक्य नसते. विद्यार्थ्याच्या वरील सर्व अडचणी लक्षात घेऊन आधुनिक भारताचा व आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यासाठी वेगवेगळी पुस्तके वाचावी लागू नयेत तसेच इतिहासाची कालानुक्रमे, मुद्देसुद्द मांडणी, अचूक संदर्भ असणारे व वस्तुनिष्ठ प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतील असे एकच पुस्तकात असावे असा आग्रह आप्पा सरांचा होता त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली
आहे. भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. भारताचा इतिहास अभ्यासताना त्याची सांगड प्रादेशिक इतिहासाशी घालावी लागते त्या दृष्टीने या पुस्तकात भारत व महाराष्ट्राच्या इतिहासातील एकाच कालखंडात घडलेल्या घटनांचा समन्वय साधून त्याची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.