Manava (मनवा)- P.S.Reghe Marathi Book katha-kadambari (Novel)
Manava (मनवा)- P.S.Reghe Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹140.00.Current price is: ₹119.00.
Back to products

Vidhimandale Aani Nyayasanthsa (विधी मंडळ आणि न्यायव्यवस्था)-Narendra Chapalgaonkar Marathi Book katha-kadambari (Novel)

70.00

Author         :      Narendra Chapalgaonkar

Edition         :      1 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vidhimandale Aani Nyayasanthsa (विधी मंडळ आणि न्यायव्यवस्था)-Narendra Chapalgaonkar Marathi Book katha-kadambari (Novel)

न्यायसंस्था आणि विधिमंडळ या दोन घटनात्मक संस्थांत अलीकडील काळात काही वाद उपस्थित झाले. दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी एकमेकांना काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सले दिले. वातावरणात काही काळ थोडासा तणावही निर्माण झाला. काही काळ हा संघर्ष सार्वजनिक चर्चेचा महत्त्वाचा विषय बनला. सजग नागरिकांत याबद्दल चितामिश्रित कुतूहल निर्माण झाले. पुण्याच्या एस० एम० जोशी फाउंडेशनमध्ये आणि वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत मी या विषयावर व्याख्याने दिली. त्यानिमित्ताने झालेला अभ्यास या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

विधिमंडळ आणि न्यायसंस्था यांच्यात आपल्या अधिकारमर्यादेबाबत, आपल्या विशेषाधिकाराबाबत मतभेद होणे आणि त्यातून संघर्ष उद्भवणे ही गोष्ट घटनात्मक लोकशाही व्यवस्थेत नवीन नाही आणि अनपेक्षितही नाही. आज असा वाद उद्भवला तर आपल्याला अधिक चिंता वाटते याचे कारण एकूणच घटनात्मक संस्थांच्या भवितव्याबद्दल काळजी वाटण्यासारखी असलेली परिस्थिती. घटनात्मक व्यवस्थेने निर्माण केलेल्या संस्था आपल्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहिल्या, तशाच इतर संस्थांशी त्यांचे संबंध समजुतीचे व परस्पराविषयी आदराचे असले तर त्या सर्वांनी मिळून चालवलेली व्यवस्था निरोगी राहते. आपले संस्थात्मक जीवन भविष्यात असे असेलच याची आपल्याला खात्री वाटेनाशी झाली आहे.

भारताच्या राज्यघटनेने विधिमंडळ, न्यायसंस्था आणि कार्यपालिका यांच्या कार्यकक्षा सांगितल्या असल्या तरी सर्वकाळ अपरिवर्तनीय व काटेकोर असेल अशी अधिकारसीमारेषा त्यांच्यात आखली जाणे अशक्य असते. काही वेळा दोन्ही संस्थांचे अधिकारक्षेत्र परस्परांच्या क्षेत्रात प्रवेश करणारे असते तर काही प्रश्नांच्याबाबत दोघांनाही आपले कर्तव्य बजावावे लागते. अशा वेळी संयम आणि विवेक यांचाच आश्रय करावा लागतो. आपल्या सहा दशकांच्या आयुष्यात भारतीय लोकशाहीने घटनात्मक संघर्षाचे असे अनेक प्रसंग अनुभवले. त्या अनुभवांच्या आधाराने विधिमंडळ आणि न्यायसंस्थेतील संघर्षांचा आणि सहजीवनाचा मागोवा या छोट्याशा पुस्तकात घेतला आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.