Varditalya Mansachya Nondi (वर्दीतल्या माणसाच्या नोंदी)-Sadanand Date Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

Author           :  Sadanand Date 

Edition          :   1 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   20422

Publisher      :   Samakaleen Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Varditalya Mansachya Nondi (वर्दीतल्या माणसाच्या नोंदी)-Sadanand Date Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

प्रस्तावना

▶ सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. आजवर अनेक सक्षम अधिकारी न्यायाची आणि सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडले आहेत, हे खेदाने कबूल करायला हवं. पण सुदैवाने आपल्याकडे असेही काही अधिकारी आहेत, ज्यांनी घटनेचा मान राखण्याची आपली शपथ तंतोतंत पाळलेली आहे. सदानंद दाते अशा पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

पोलिस खात्याच्या व्यवस्थापकीय पर्दावर अधिकाऱ्यांची थेट भरती करण्याची पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली; कारण आपल्या देशात भ्रष्टाचार रुजलेला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहत असल्याचं त्यांचं मत होतं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी थेट विद्यापीठांमधून सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या नेमणुका करण्याचं आणि त्यांना इतर अधिकाऱ्यांह्न चांगले पगार देण्याचं ठरवलं. आय.पी. (इंपीरियल पोलिस) मध्ये भरती झालेल्या अशा अधिकाऱ्यांचं प्रमुख काम होतं, ते म्हणजे स्टेशन हाऊस ऑफिसर्स आणि इतर कनिष्ठांच्या तपासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून अपराधी पकडले जातील हे पाहणं आणि एकाही निरपराध्याला हकनाक शिक्षा होणार नाही याची खातरजमा करणं. स्वातंत्र्यानंतरही सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या अशा थेट नेमणुका सुरू राहिल्या. सुरुवातीच्या अशा अधिकाऱ्यांनी आपल्या पूर्वसुरींची परंपरा पुढे चालवली. त्याच वेळी, अशा अधिकाऱ्यांनी सत्याची कास सोडू नये आणि कायद्याने मिळालेल्या अमाप सत्तेचा गैरवापर करू नये याकडे राजकारणी जातीने लक्ष ठेवून होते.

आता इतक्या वर्षांनी परिस्थिती खूपच पालटली आहे. भारतातल्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी कायद्याला बगल देऊन सत्यापेक्षा राजकारण्यांच्या इच्छांनुसार चालावं यासाठी सत्तेचा वारंवार वापर करून पोलिसांना आमिषं दाखवली जातात. यामुळे गुन्हेपीडितांवर अपार अन्याय होतो. त्याच वेळी गुन्हेगारांनाही बळ मिळतं. पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या करणाऱ्या राजकारण्यांचा वरदहस्त असेल तर आपल्याला कुणी

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.