Uttarlekhan-Tukaram Jadhav,Mahesh Shirapurkar,Sahil Sontakke,Rutuja Velhal (Answer Writing) UPSC-MPSC Marathi Unique
₹100.00 Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00.
Author : Tukaram Jadhav,Mahesh Shirapurkar,Sahil Sontakke,Rutuja Velhal
Edition : 1 ed 2026
Language : Marathi
Publisher : Unique Academy Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Uttarlekhan-Tukaram Jadhav,Mahesh Shirapurkar,Sahil Sontakke,Rutuja Velhal (Answer Writing) UPSC-MPSC Marathi Unique
प्रस्तावना : उत्तरलेखन अर्थ, घटक आणि पैलू
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी राज्यसेवा (राज्य नागरी सेवा) मुख्य परीक्षा 2025 सालापासून लेखी व वर्णनात्मक स्वरूपाची झाली आहे. हे आता सर्वांना माहिती झाले असणार, यात शंका नाही. या नव्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन (एकूण 4 पेपर्स, 1000 गुण); एक वैकल्पिक विषय (दोन पेपर्स, 500 गुण) आणि निबंध (एक पेपर, दोन विषय, 250 गुण) हे तीन मुख्य विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकसेवा आयोगाने सामान्य अध्ययन व वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम सखोल व सविस्तरपणे जाहीर केलेला आहे. तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, त्यातील एकूण प्रश्न, त्यांचे गुण आणि शब्दमर्यादा हे महत्त्वपूर्ण तपशीलही स्पष्ट केलेले आहेत. थोडक्यात, मुख्य परीक्षेचा सर्व आराखडा आणि तिचे बदललेले लेखी (वर्णनात्मक) स्वरूप याविषयी कोणतीच संदिग्धता ठेवलेली नाही.
स्वाभाविकपणे मुख्य परीक्षेच्या अभ्यास व तयारीच्या प्रक्रियेत विविध विषयांचे आकलन आणि त्यावरील प्रश्नांचे वर्णनात्मक, लेखी स्वरूपात उत्तर लिहिणे आता नितांत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून द युनिक अॅकॅडमीने ‘उत्तरलेखना’वरील ही मार्गदर्शक संदर्भ-पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले. वस्तुतः द युनिक अॅकॅडमीने सन 2006 पासून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचे अध्यापन आणि विशेषतः लेखन क्षमतेच्या विकासासंदर्भात विविध उपक्रमांद्वारे तज्ज्ञता प्राप्त केली आहे. या अनुभवाच्या आधारे ही लेखनावरील मार्गदर्शिका तुमच्या समोर सादर करताना विशेष आनंद होत आहे.
उत्तरलेखन म्हटले की, पहिली महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे काळजीपूर्वक केलेले सूक्ष्म वाचन व समग्र आकलन होय. आपले वाचन जितके बारकाईने व सविस्तरपणे केलेले असेल तितके त्यासंबंधीचे आकलन अचूक, नेमके व यथार्थ ठरेल. यामुळे आपल्या उत्तरलेखनात आकलनातील सर्व आवश्यक, समर्पक व अपेक्षित घटक येत आहेत (की नाहीत) याची खातरजमा करता येते. म्हणून ‘चांगल्या वाचनाशिवाय चांगले-उत्तम लेखन नाही’ हे कायमच ध्यानात ठेवावे.
चांगले लेखन म्हणजे, असे लेखन (लिखाण) ज्यात अर्थाची स्पष्टता व नेमकेपणा आहे; जे थोडक्यात मात्र योग्य शब्दांत मांडले आहे म्हणजे संदिग्ध, पाल्हाळिक व पसरट लिहिणे टाळावे. कोणताही आशय सुस्पष्टपणे कळला पाहिजे.
दुसरे म्हणजे भाषेचा पैलू होय. ज्यात योग्य शब्दांचा वापर, व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यरचना, प्रमाणलेखन, शुद्धलेखन (काना, मात्रा, वेलांटी, उकार इ.), विरामचिन्हांचा योग्य वापर आणि आणि विषयानुरूप समर्पक परिभाषेचा वापर हे पैलू समाविष्ट होतात. अर्थात चांगली भाषा म्हणजे अलंकारिक लिहिणे, असे नाही. साधी मात्र स्पष्ट, अर्थवाही व व्याकरणदृष्ट्या योग्य भाषा ही चांगली भाषा हे लक्षात ठेवावे. एका बाजूला
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.