Toortas (तूर्तास)-Dasu Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

Original price was: ₹250.00.Current price is: ₹213.00.

Author           :        Dasu Vaidya 

Edition          :         3 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        978817185306

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Toortas (तूर्तास)-Dasu Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

स्वातंत्र्योत्तर कालखंडात एकूणच भारतीय साहित्यामध्ये बदल घडून येऊ लागले. मराठी साहित्यातही बदल होणे क्रमप्राप्त होते. त्याप्रमाणे मराठी साहित्यातही परिवर्तन होऊ लागले. या परिवर्तनाच्या पहिल्यावहिल्या खाणाखुणा कविवर्य बा. सी. मर्देकर आणि गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्यातून दिसू लागल्या. इतरही काही लेखक-कवींचा या संदर्भात निर्देश करता येऊ शकेल. भाषिक पातळीवर हे परिवर्तन जाणवू लागले आणि त्याचाच मराठी साहित्यामध्ये अधिक विचार झाला. तो विचार व्हायला नको होता असे नाही, परंतु अनुभवाच्या बदललेल्या रूपाबद्दल अधिक विचार झाला असता तर बरे झाले असते. अनुभवाच्या बदलेल्या रूपाबद्दल विचार करताना सर्वप्रथम जर काही जाणवत असेल तर ते हे की सामान्य माणूस क्रमाक्रमाने सर्व व्यवहाराच्या केंद्रस्थानी येऊ लागला. परिणामतः साहित्यव्यवहारातही सामान्य माणूस हा लेखक-कवींच्या चिंतनाचा विषय झाला. सामान्य माणसाचे जगणे, त्याचे भावविश्व, त्याच्या श्रद्धा आणि त्यांच्या मर्यादाही कवी, लेखकांना खुणावू लागल्या. गाडगीळ-गोखले यांच्या कथासाहित्यामधून आणि मर्डेकर-मुक्तीबोध यांच्या कवितेतून तो प्रकटू लागला. तसे तर प्रत्येक कालखंडात सामान्य माणूस असतोच. किंबहुना कुठलाही कालखंड सामान्य माणसाच्या श्रमावरती आणि निष्ठांवरती उभा असतो. परंतु दुर्दैवाने या सामान्य माणसांच्या श्रमाचा आणि निष्ठांचा विचार फारसा कधी झाला नाही. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांच्या आगमनाबरोबर सामान्य माणूस एकदम केंद्रस्थानी आला. जीवनाच्या सर्व स्तरांवर त्याचा विचार सुरू झाला. सामाजिक स्तरांवर त्याच्या उत्थापनाचे प्रयत्न सुरू झाले आणि कला-साहित्यातही हा सामान्य माणूस हळूहळू आपल्या जगण्यासह अवतरू लागला. परंतु हा सामान्य माणूस प्रकर्षाने मराठी साहित्यात दिसू लागला तो १९७५ नंतरच. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली पहिली पिढी विचार करू लागली, लिहू लागली, बोलू लागली आणि सामान्य माणूस साहित्यातुन ‘साकार’

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.