

The Silent Coup : Lokshahiche Vastavya (Marathi Edition)
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
Author : Josy Joseph
Editor : Poonam Chatre
Edition : 2023
ISBN : 9789391629632
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
The Silent Coup : Lokshahiche Vastavya (Marathi Edition)
भारत हा एक अभिमान वाटावा, असा संसदीय लोकशाहीचा देश आहे, ज्याला कधीही लष्करी बंडखोरीला सामोरं जावं लागलेलं नाही. शेजारच्याच देशांमध्ये अशी बंड नेहेमीच होत असताना आणि तिथे संविधानाला फारसं महत्त्व दिलं जात नसताना, या देशात ‘असं न होण’ हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण, आता अनेक दशकांपासून भारतीय लोकशाहीचा पाया खिळखिळा होत चाललेला आहे. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात, देशाला ‘अंशतः स्वतंत्र” असं मानांकन मिळालं आहे, तर आणखी एका सर्वेक्षणातून ती ‘मतपेटीतली हुकूमशाही’ आहे असं नोंदवलं गेलेलं आहे.
जोजी जोसेफ यांनी या घसरणीचा शोध घेतला आणि त्यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला दहशतवादाची हाताळणी करण्याच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण यंत्रणा उसवलेली आहे. १९८० आणि १९९०च्या दशकांमध्ये भारतभर बंडखोरीची लाट उसळली आणि ती हळूहळू पसरत गेली. तिच्याशी दोन हात करताना संपूर्ण संरक्षणयंत्रणेला संघर्ष करावा लागला. त्या लाटेखाली गुदमरून गेल्यामुळे पोलीस दल, गुप्तवार्ता यंत्रणा, केंद्रीय तपासयंत्रणा, कर विभाग आणि इतर यांनी काही अभिनव कल्पना शोधून काढल्या; ज्यांचं स्वरूप कधीकधी भयानकही होतं : खोटे किंवा काल्पनिक पुरावे तयार करण्यापासून दहशतवादी हल्ले करणं आणि चक्क दहशतवादी संघटना तयार करण्यापर्यंत ही मजल गेली. कालांतरानं, दहशतवाद म्हणजे भरभराटीचा, अनेक कंगोरे असलेला एक धंदा झाला.
काश्मीरमधल्या दहशतवादापासून श्रीलंकेतल्या नागरी युद्धापर्यंत, मुंबईवर झालेल्या हल्ल्यापासून ईशान्य भारतात अनेक दशकं सुरू असलेल्या बंडखोरीपर्यंत, भारताचं दहशतवादाशी युद्ध सुरूच आहे. त्यामुळेच, देशाची संरक्षणयंत्रणा अधिकाधिक राष्ट्रवादी आणि अराजकतावादी झालेली आहे, आणि भ्रष्टदेखील. यातला सगळ्यांत धोकादायक भाग असा, की गुप्तचर यंत्रणा, पोलिस दल, गुप्तवार्ता विभाग यासह जवळपास संपूर्ण संरक्षण यंत्रणा ही राजकारण्यांच्या हातात गेलेली आहे.
बंडखोरी, दहशतवाद आणि संरक्षणयंत्रणा यांनुषंगाने सुमारे दोन दशकं पत्रकारिता केल्यावर तयार झालेलं ‘लोकशाहीचे वास्तव’ हे पुस्तक म्हणजे देशाला दिलेली हाक आहे. जोसेफ म्हणतात, ‘लोकशाहीला भारतातून उलथवण्यासाठी लष्करी उठावाची आवश्यकता नाही, ती त्या आधीच उलथवली गेलेली आहे.’
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.