TET Papar-2 Magil Varshachya Prashanpatrika + Sarav Prashanpatrika-Brijmohan Dayma, Ramesh Balwad Vidyabhartee

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

Author        :     Dr. Brijmohan Dayma, Ramesh Balwad 

Edition        :     New

Language  ‏ :     MARATHI

Publisher   :     Vidyabhartee Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

TET Papar-2 Magil Varshachya Prashanpatrika + Sarav Prashanpatrika-Brijmohan Dayma, Ramesh Balwad Vidyabhartee

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात महत्त्वाचे

आत्मविश्वासाने तयारी करा ‘परीक्षा आणि आत्मविश्वास हे समीकरण शिक्षण पद्धतीने वर्षानुवर्षे मांडलेले आहे त्यातही ती परीक्षा अनिवार्य असेल तर आत्मविश्वास अधिक प्रबळ हवा.

मुळात पात्रता परीक्षा हे आपण अभ्यासलेल्या ‘डि.टी.एड. अभ्यासक्रमाचे सार आहे त्यात पहिली ते दहावी पर्यंतचा वस्तुनिष्ठ अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे त्यामुळे यात घाबरण्यासारखे काहीच नाही.

प्रश्न तुमचे उत्तरे आमची टी.ई.टी. पेपर १ व पेपर २ संदर्भात महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांकडून अनेक प्रश्न ‘विद्याभारती’ च्या संपादक मंडळाकडे आले आहेत, येत आहेत, त्यातील महत्त्वाचे व प्रातिनिधीक प्रश्नांची या ठिकाणी उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत.

१. सी.ई.टी. असताना टि.ई.टी. कशाला? सी.ई.टी. हे भरती करणाऱ्या विभागाची गुणवत्ताधारक शिक्षक निवडीसाठीची निकषांधारित स्पर्धा असते जी विभागनिहाय भिन्न असते. (जिल्हा परिषद, समाजकल्याण, खाजगी संस्था) मात्र सी.ई.टी. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतून नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी ‘अनिवार्य’ निकष आहे. शिक्षण अधिकार कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यकच आहे.

२. टी.ई.टी. स्पर्धा कमी करण्यासाठी आहे का? टी.ई.टी. ही स्पर्धा परीक्षा नाही. दिवसेंदिवस शिक्षणातील गुणवत्तेचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे तज्ज्ञ व प्रशिक्षीत शिक्षकांची आवश्यकता आहे. टी.ई.टी. अशाच गुणवत्ताधारक शिक्षकांची ‘शिक्षक’ म्हणून अभियोग्यता तपासण्यासाठीची व्यवस्था आहे. नोकरभरतीतील स्पर्धा कमी करणे हा या परीक्षेचा उद्देश नाही.

३. शिक्षक पात्रता परीक्षा काय आहे ? जसे प्राध्यापक होण्यासाठी UGC मार्फत NET परीक्षा घेतली जाते तसेच मानव विकास मंत्रालयाने २३ ऑगस्ट २०१० रोजी जाहिर केलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व सरकारी / खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षक/प्रशिक्षीत शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.

एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ वर्षभरातून किमान एकदा आयोजित करणे अनिवार्य आहे. ही पात्रता उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थीस एक प्रमाणपत्र दिले जाईल. ज्यात त्यांचा नाव व पत्ता, नोंदणी क्रमांक, प्रमाणपत्र दिले गेल्याचा दिनांक, विषयनिहाय प्राप्त गुण, इयत्ता १ ली ते ५ वी / ६ वी ते ८वी किंवा दोन्ही इयत्तांसाठी शिक्षक बनण्याची पात्रता विषय क्षेत्र (पेपर क्रमांक २ साठी सामाजिक शास्त्रे / गणित व विज्ञान) इत्यादींची पूर्ण माहिती असले.

या प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षार्थी शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यास पात्र असतील, या प्रमाणपत्राची वैधता परीक्षा आयोजीत करणारी यंत्रणा ठरवेल मात्र हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत वैध असेल.

प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही परीक्षार्थी गुणवत्ता विकसनासाठी ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतात.

४. सेवेतील शिक्षकांसाठी टि.ई.टी. आहे का? पूर्वीपासुन खाजगी, सरकारी शाळांमधील प्राथमिक व पदवीधर शिक्षकांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक नाही. मात्र, जुन्या शाळेतून नवीन शाळेत नियुक्त व्हावयाचे असल्यास टी.ई.टी. उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

५. टी.ई.टी. मुळे शिक्षक व्यवसायाकडे असलेले आकर्षण कमी होईल का? अजिबात नाही, याउलट शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार शिक्षक व विद्यार्थी प्रमाण १:३० असे अपेक्षित आहे त्यामूळे हे लक्ष्य गाठण्यासाठी पाच लाखांहून अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे व्यवसायासाठी हे क्षेत्र सुरक्षित आहे.

Available at Ksagar Book Centre or on www.

ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.