

Sattantar : 1947 (सत्तांतर : १९४७)-Govind Talwalkar-Marathi (novel) Book katha-kadambari
₹400.00 Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.
Author : Govind Talwalkar
Edition : 3 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Sattantar : 1947 (सत्तांतर : १९४७)-Govind Talwalkar-Marathi (novel) Book katha-kadambari
ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी हिंदुस्थानात आली आणि तिने आपले राज्य स्थापन केले. १८५७ सालच्या बंडानंतर, ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीची सत्ता संपुष्टात आणून राणीचा अंमल सुरू केला ज्याच्यावरून सूर्य कधी मावळत नाही अशा सार्वभौम ब्रिटिश साम्राज्याचा हिंदुस्थान एक भाग झाला. कंपनी सरकारच्या स्थापनेपासूनच त्याच्याबद्दल इंग्लंडमधील उदारमतवादी नेते व साम्राज्यवादी मुत्सद्दी यांच्यात वैचारिक संघर्ष होता. ब्रिटिश राज्यपद्धतीमुळे आणि शैक्षणिक व सामाजिक सुधारणांमुळे हिंदुस्थानात जागृती होऊ लागली. १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. भारतीयांत आपल्या राजकीय हक्कांची जाणीव वाढत व तीव्र होत गेली. १९२० पासून असहकाराच्या व सत्याग्रहाच्या चळवळींमुळे तिला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त झाले. १९२९ साली काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. ते स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी उदयाला आले.
भारतात घडलेल्या या ऐतिहासिक सत्तांतराला नव्वद वर्षे लागली. या दीर्घ काळाचा साक्षेपी इतिहास ‘सत्तांतर १९४७’ या त्रिखंडात्मक ग्रंथात आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सुचवलेल्या घटनाविषयक सुधारणांचा, त्यांच्या प्रेरणांचा व यशापयशाचा आढावा त्यात आहे. त्या सुधारणांच्या योजना व वाटाघाटी, गोलमेजांभोवतीच्या परिषदा व शिष्टाया, त्यांत भाग घेणाऱ्या भारतीय नेत्यांच्या भूमिका आणि व्यक्तिमत्त्वे यांचा रेखीव आलेख त्यात आहे. जागृत भारतात झालेल्या सनदशीर चळवळी व सशस्त्र क्रांतिकारकांचे उद्रेक, आदिवासींचे उठाव, शेतकऱ्यांचे व कामगारांचे लढे आणि अहिंसक सत्याग्रह्यांचे देशव्यापी संग्राम यांचा मागोवा त्यात आहे. भारताचे स्वातंत्र्य आपल्याबरोबर फाळणी घेऊन आले त्याचा शोध आहे. एका बलाढ्य साम्राज्याच्या अस्ताची जागतिक संदर्भात सांगितलेली कथा आहे.
ज्येष्ठ संपादक व लेखक श्री० गोविंद तळवलकर यांनी या अनेकपेडी सत्तांतराचे निवेदन तटस्थ इतिहासकाराच्या वस्तुनिष्ठ दृष्टीने केले आहे. त्यांच्या दीर्घ व्यासंगाचा व माहितगारीचा भक्कम आधार त्याला आहे. त्यांचे घटनांचे व व्यक्तींचे मूल्यमापन मार्मिक आहे. त्यांच्या नितळ, प्रवाही व सुबोध शैलीमुळे सगळे विवेचन रोचक झाले आहे. आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील मराठी ग्रंथांत ‘सत्तांतर : १९४७’ या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.