Pardha Pariksha Planner Sandhi Samasya Aani Avhana-Rajeev Nandkar K Sagar
₹360.00 Original price was: ₹360.00.₹252.00Current price is: ₹252.00.
Author : Rajeev Nandkar
Edition : 2026
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Pardha Pariksha Planner Sandhi Samasya Aani Avhana-Rajeev Nandkar K Sagar
सृष्टीतला प्रत्येक जीव हा त्याच्या जीवनप्रवासात सातत्याने स्पर्धा करत असतो. ही स्पर्धा मूलतः जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी असते. मात्र, मानव हा केवळ जगण्यासाठीच स्पर्धा करत नाही, तर त्याही पुढे जाऊन, आपलं या भूतलावरचं अस्तित्व अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी तो संघर्ष आणि स्पर्धा करत असतो. ही स्पर्धा कधी स्वतःशी, कधी आप्तस्वकीयांशी, तर कधी समाजातील विविध घटकांशी अखंड चालू असते. या स्पर्धेतूनच अनेकदा संघर्ष निर्माण होतात, तरीही तो पुढे मार्गस्थ होत असतो. त्याला हे माहीत असतं की, आयुष्य हा एक संघर्षमय प्रवास आहे आणि ‘स्पर्धा’ ही या प्रवासातली एक अनिवार्य बाब आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास कोणत्याही सजीवाला स्पर्धेतूनच पूर्ण करावा लागतो. त्यामुळे ‘स्पर्धा’ हा सृष्टीतल्या कोणत्याही सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. चार्ल्स डार्विन यांचा ‘सव्र्व्हयव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा सिद्धान्तदेखील स्पर्धेवर आधारित आहे. डार्विन यांच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तातून नैसर्गिक निवडीच्या कार्यपद्धतीचं वर्णन केलं आहे. त्यानुसार, ‘बलिष्ठ अतिजीविता’, म्हणजे थोडक्यात, ‘जो बलवान जीव आहे, तोच जगण्यास समर्थ आहे’, असं सूचित केलं गेलं आहे. गेल्या एक लाख वर्षांपासून मानवाने सृष्टीवर अधिराज्य गाजवताना, जगण्याची आणि पुढे जाण्याची ही स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचं इतिहासात आणि वर्तमानातही दिसून येतं.
‘स्पर्धा परीक्षा’ ही शासकीय नोकरी मिळवण्याचं एक साधन आहे. दरवर्षी महाराष्ट्रात साधारण दहा ते पंधरा लाख विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतात. असं असलं, तरी अनेक कष्टाळू विद्यार्थी, गुणवत्ता असूनही, योग्य मार्गदर्शनाच्या अभावी या स्पर्धेत मागे पडतात. स्पर्धा परीक्षा हा एकप्रकारे यज्ञच आहे. यात एकदा निर्णय घेऊन उडी घेतली की, मागे फिरता येत नाही. अनेक परीक्षार्थी आठ ते बारा वर्षे या परीक्षांचा अभ्यास करताना आढळतात. एक परीक्षा झाली की दुसरी, मग तिसरी… अशा चक्रव्यूहात ते अडकतात. एक वेळ अशी येते की, त्यांची इच्छा असूनही यातून बाहेर पडणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे असे परीक्षार्थी कुटुंब आणि समाजापासूनही विन्मुख होताना दिसतात.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.