Maharashtra Darshan (महाराष्ट्र दर्शन)-Suhas Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Author           :  Suhas Kulkarni 

Edition          :   2 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9290

Publisher      :   Samakaleen Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Maharashtra Darshan (महाराष्ट्र दर्शन)-Suhas Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

नमन

▶ ‘महाराष्ट्र दर्शन’ हा एक पुस्तकप्रकल्प आहे. तो एक पुस्तक प्रयत्नही आहे. महाराष्ट्राचं बहुरंगी दर्शन घडवण्याचा प्रयत्न.

हा प्रयत्न का करावासा वाटला, त्याची पार्श्वभूमी आधी थोडक्यात सांगतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. एका प्रदीर्घ आणि चिवट लढ्यातून

मराठी भाषकांचं हे राज्य निर्माण झालं. डांग आणि बेळगाव वगैरे भाग संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊ शकले नाहीत, पण उर्वरित मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाले. उराशी एक स्वप्न बाळगून महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली. सहा दशकांच्या वाटचालीनंतर त्या स्वप्नाचं काय झालं, हा सर्वंकष चर्चेचा विषय आहे आणि सुजाण मंडळी त्यावर चर्चा-विचारविनिमय करत असतात. गेल्या सहा दशकांत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती झाली आहे आणि आर्थिक-सामाजिक औद्योगिक शैक्षणिक तांत्रिक अशा सर्वच क्षेत्रांत पावलं पुढे पडली आहेत हे खरंच आहे. पण विकासाची फळं कुणाला चाखायला मिळाली, विकासाचा असमतोल कुणाच्या नशिबी आला, विषमतेच्या खाईत कोण ढकललं गेलं हेही सर्वविदित आहे. याचा अर्थ, राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रगती झाली; पण समाज म्हणून तिची फळं सर्व घटकांपर्यंत पोहोचली नाहीत, असा होतो.

महाराष्ट्राच्या या प्रवासाला अनेक कंगोरे आहेत. या सर्व काळात राज्यामध्ये काही प्रक्रिया उलगडल्या आहेत. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकारी कारखानदारी उभारली गेली. त्यानंतर मोठ्या शहरांच्या आसपास औद्योगिक विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या दोन्ही प्रयत्नांमुळे खेड्यांमध्ये व शहरांमध्ये काही घटकांच्या हाती पैसा आला; परंतु शेतीचा विकास-विस्तार करण्यात आणि शेतीला फायदेशीर व्यवसाय म्हणून उभं करण्यात अपयश आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली. परिणामी, तरुणांचे लोंढे शहरांमध्ये येऊ लागले. त्यातून शहरीकरण वाढलं. शहरं वाढत गेली; त्यांची बकाली वाढली. शहरांमध्ये आलेल्यांना जगण्यापुरता आधार मिळाला, परंतु किमान प्रतिष्ठेचं आयुष्य मिळू शकलं नाही. दुसरीकडे, टीव्ही, सिनेमा, नवी माध्यमं यांनी जग जवळ आणलं, नव्या जगण्याचं दर्शन घडवलं, नवी स्वप्नं दाखवली; पण ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची आणि आपापली आयुष्यं बदलून टाकण्याची संधी सर्वांना मिळाली नाही. त्यातून मनाची हतबलता, विषण्णता, आभासी जगात वावरण्याची मनोवृत्ती, व्यसनाधीनता असे अनेक परिणाम घडत गेले. ज्यांना संधी साधता आली ते पुढे गेले, पण ज्यांची गाडी सुटली ते मागेच राहिले. सर्वस्वी निरुपयोगी शिक्षण मिळूनही ज्यांनी स्वतःच्या जोरावर परिस्थितीवर मात केली, त्यांचं नशीब फळफळलं. पण जे कुचकामी डिग्ग्रांवर विसंबले त्यांच्या नशिबी भ्रमनिरास आला. जे शिकूच शकले नाही, त्यांना मेहनत मजुरीचा आसरा घ्यावा लागला.

 

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.