

Lokmanya Tilak aani Mahatma Gandhi (लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी)- Narendra Chapalgaonkar Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Narendra Chapalgaonkar
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 11453
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Lokmanya Tilak aani Mahatma Gandhi (लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी)- Narendra Chapalgaonkar Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
लेखकाचे मनोगत
▶ कुटुंबातला वारसा अगर राजेशाही असलेल्या देशातल्या सत्तेचा वारसा कोणाकडे जाणार हे परंपरेने अगर कायद्याने ठरलेले असते. कायदेशीर वारसाला हुसकावून देऊन एखाद्याने मधेच घुसून सत्ता बळकावली तर ती गोष्ट वेगळी. जेथे पक्ष संघटना बांधीव आहेत, जेथे त्यात लोकशाही व्यवस्था आहे तेथे पक्षप्रमुखत्वाचा वारसा पक्षाचे सभासद बहुमताने ठरवतात. जेथे स्वातंत्र्यासाठीची चळवळ चालू असते, राजकीय पक्षही बांधणीने मजबूत आणि नियमबद्ध झालेला नसतो तेव्हा चळवळीचे आणि पर्यायाने देशाचे नेतेपद कसे ठरते? परिस्थितीतून, लोकांच्या अप्रत्यक्ष संमतीतून राष्ट्रीय नेतृत्व उदयाला येते. या नेतृत्वाचा वारसाही परिस्थिती आणि लोकच ठरवतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना राष्ट्रीय नेतृत्व परिस्थिती आणि लोकांनी बहाल केले आणि महात्मा गांधींनाही ते पद तसेच मिळाले.
एका राजकीय नेत्याचा वारस म्हणून दुसऱ्या नेत्याला लोकमान्यता मिळते तेव्हा तो पूर्णांशाने पहिल्याचा अनुयायी असतो असे गृहीत धरता येत नाही. महात्मा गांधी हे काही टिळकांचे अनुयायी नव्हते, पण टिळकांचे मोठेपण त्यांना मान्य होते. त्या पार्श्वभूमीवरच आपल्याला पुढे जावयाचे आहे, हेही त्यांनी लक्षात घेतले होते. टिळकांबद्दल त्यांच्या मनात आदर होता आणि त्यांच्याशी जाहीरपणे मतभेद व्यक्त करण्याचे प्रसंग ते टाळत होते. ही गोष्ट लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा सांधा जुळून येण्यासाठी उपयुक्त ठरली होती. लोकमान्यांनीही गांधीजींच्या नेतृत्वगुणाचे विशेष लक्षात घेतले होते. उद्याच्या भारतात गांधी राष्ट्रनेते होतील हे लक्षात आल्यामुळे त्यांनीही गांधीसोबत निर्माण झालेले धोरणविषयक मतभेद शक्यतो चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आपला वारसा आपल्याच पद्धतीने राजकारण करणाऱ्या कोण्या अनुयायाकडे जाणार नाही, गांधीजीच ती धुरा सांभाळणार आहेत हेही त्यांना माहीत होते. म. गांधींचे नेतृत्व हळूहळू उदयाला येत आहे, चळवळीच्या त्यांच्या मार्गाला लोकांचा पाठिंबाही मिळू लागलेला आहे हे टिळकांना कळले होते.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.