Lokamanyaancha Manasputra (लोकमान्यचा मानसपुत्र)-Bal J.Pandit Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
Author : Bal J.Pandit
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 2074
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Lokamanyaancha Manasputra (लोकमान्यचा मानसपुत्र)-Bal J.Pandit Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
प्रस्तावना
महाराजांच्या जीवनाचा जेव्हा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला असे वाटते की, महाराजांच्या जीबनाने चित्रपटाला एक फार मोठे कथानक पुरवले आहे. सध्याचे दिवस चित्रपटाचे आहेत. बहतेक चित्रपटांमध्ये नायक हा अत्यंत कठीण परिस्थितीत असतो, अनेक संकटांशी झगडत असतो आणि अपघाताने त्याच्या जीवनामध्ये अशी काहीतरी घटना घडते की त्याचे माग्य उदयाला येते. परंतु भाग्याचा फायदा घेतानाही त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्याच्या आयुष्याचा शेवट मात्र गोड होतो. महाराजांच्या जीवनामध्ये असेच काही घडलेले आहे. एका खेड्यातला एक सामान्य मुलगा अचानकपणे दत्तक म्हणून कसा निवडला जातो, त्या निवडीमध्ये महाराष्ट्रातील थोर थोर विचारवंत मंडळी त्यात लोकमान्य टिळकांचा समावेश असतो आणि लोकमान्य टिळकांचा तिसरा मुलगा म्हणून त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा आणि त्यांच्या सहवासातील उत्तमोत्तम संस्कार घेण्याचा लाभ त्याला घडतो. ज्या लोकमान्य टिळकांचे नुसते दर्शन घ्यावे म्हणून भारतातील लक्षावधी लोक तासन् तास त्यांच्या मार्गावर वाट पाहत थांबत असत, त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा एखादा उद्गार ऐकायला मिळावा म्हणून हजारो लोक त्यांच्या सभेला जात असत, त्या लोकमान्य टिळकांचा सहवास एका सामान्य खेडुत मुलाला आयुष्यभर लाभला यापेक्षा अधिक अनपेक्षित असा अपघात कोणता घडू शकतो? आणि एखाद्या चित्रपटात तो दाखवलेला आहे असे मला वाटत नाही. जसे मोठ्या व्यक्तीच्या सहवासात राहण्यामध्ये काही फायदे असतात, तशा काही अडचणीही असतात. अडचण अशी असते की लोक त्या मोठ्या व्यक्तीकडे पाहत असतात आणि हा त्यांचा मुलगा, हा त्याच कुटुंबातला पुढच्या पिढीचा वारस, तो काय करून दाखवणार आहे, हे जाणण्याची कुटुंबीयांची व समाजाची अपेक्षा असते. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कर्तृत्व एवढे थोर की त्यांचे अनुकरण करणे कोणालाही अशक्य होते. परंतु अशा थोर जीबनामधून आपल्या व्यक्तिमत्त्वाला झेपेल असे आपण काय घेऊ शकू हे जाणण्यासाठी एक प्रकारची शक्ती लागते, एक प्रकारची जाणकारता लागते आणि ती जाणकारता महाराजांनी फार अचूकपणे दाखवली आहे असे मला वाटते. लोकमान्यांचा भर हा महाराजांना उत्तमोत्तम संस्कार देण्यावर होता. त्या प्रयत्नाला फळ येऊन चार महत्त्वाचे संस्कार लोकमान्यांपासून महाराजांनी घेतले, असे मला त्यांचे चरित्र पाहिल्यानंतर व त्यांच्या सहवासाचा थोडासा लाभ घेतल्यानंतर जाणवले.
महाराजांमध्ये मला तीन-चार गोष्टी महत्त्वाच्या दिसल्या –
पहिली गोष्ट – कृतज्ञतेची भावना.
दुसरी गोः – ज्ञानाबद्दल व शिक्षणाबद्दल प्रेम.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.