Kahani Pabalchya Vidnyan Aashramachi (कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची)-Yogesh Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author           :  Yogesh Kulkarni

Edition          :   1 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   28372

Publisher      :   Samakaleen Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Kahani Pabalchya Vidnyan Aashramachi (कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची)-Yogesh Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

प्रस्तावना

पुस्तकाच्या वाचनाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव वाचकांपुढे ठेवणे, ते पुस्तक वाचणे का आणि कसे श्रेयस्कर आहे हे सांगत, त्यासाठी वाचकांना उद्युक्त करणे हे प्रस्तावनेचे मुख्य प्रयोजन असते. त्यामुळे ती पुस्तकाच्या आरंभीच छापली जाते. मात्र, लिहिली जाते शेवटी आणि वाचली जाते क्वचितच! (प्लेस्ड फर्स्ट, रिटन लास्ट अँड रेड लीस्ट!) अनेक पुस्तकांच्या बाबतीत आकर्षक शीर्षक व मुखपृष्ठ, विषयवस्तूचे महत्त्व, लेखकाचा लौकिक, ब्लर्ब्स, सचित्र पृष्ठसजावट, इ. बाबी वाचकास पुस्तक वाचायला प्रवृत्त करण्यास पुरेशा असतात. असा वाचक मग त्याच्या वाटेत आडवी येणारी प्रस्तावनेची पाने लगबगीने दूर सारून सहसा मुद्द्याच्या पानावर येतो, हे सत्य मी वाचक म्हणून स्वानुभवाने जाणतो! तरीही डॉ. योगेश कुलकर्णी लिखित ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा मोह आवरेना. कारण ग्रामीण भारताच्या समस्या आणि त्यावर समुचित अशा तंत्रवैज्ञानिक शिक्षणातून शोधलेली अभिनव उत्तरे वाचताना माझ्या अंतःकरणात ‘युरेका!’ किंवा ‘अहा!’ असे उत्कट आनंदतरंग पदोपदी (किंवा पानोपानी) उमटत राहिले. त्यातले काही ‘या हृदयीचे त्या हृदयी’ उमटवल्याशिवाय मला राहवेना. तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी। धरिता ही परी आवरेना।।’

डॉ. श्रीनाथ कलबाग हे ग्रामविकासकेंद्री तंत्रशिक्षण संकल्पनेचे जनक आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी स्थापन झालेल्या ‘विज्ञान आश्रम, पाबळ’ या संस्थेचे संस्थापक. ग्रामीण जनतेच्या जीवनातल्या खऱ्याखुऱ्या गरजांपासून तुटलेले आणि ग्रामविकासाचे उद्दिष्ट गमावून बसलेले पुस्तकी शिक्षण हे शिक्षणच नव्हे, ते कुचकामी आहे, अशी त्यांची धारणा होती. तशा निरुपयोगी व घातक शिक्षणाला त्यांनी आपल्या प्रयोगांमधून आणि अपार कष्टांतून एक भक्कम पर्याय उभा केला. ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून अधिक फलदायी असा विज्ञाननिष्ठ ग्रामविकास’ हे त्यांचे ध्येय होते. १९८३ ते २००३ ही त्यांच्या जीवनाची अखेरची दोन दशके म्हणजे

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.