Jeshtha (ज्येष्ठ)-Anant Manohar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹600.00 Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.
Author : Anant Manohar
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 32964
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Jeshtha (ज्येष्ठ)-Anant Manohar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
‘ज्येष्ठ’ च्या संदर्भात ….
मनाच्या एका कोपऱ्यात, आता आठवतं की कित्येक वर्षांपासून तथाकथित ज्येष्ठ कौतेय युधिष्ठिर जागा व्यापून राहिला होता. महाभारत प्रथम वाचले तेव्हापासून युधिष्ठिर मनात होता. अगदी पहिल्या वाचनापासून युधिष्ठिरावर मन नाराज झालं होतं. दाबलं गेलेलं व्यक्तिमत्त्व, शौर्य, तेज, पराक्रमांचा अभाव, धर्म-अधर्माच्या अतिसूक्ष्म विचारामुळे सदैव गोंधळलेला, भोळा, द्युतप्रेमी युधिष्ठिर हेच पांडवांच्या दुःखाचे मूळ आहे असे तीव्रतेने वाटत होते. कुंतीने वेळेवर कर्णजन्मरहस्य प्रकट केले असते आणि कर्णाचे कतियत्व समाजाने स्वीकारले असते तर आजच्या महाभारतात कायकाय बदल झाले असते या ‘जर’ ‘तर’ च्या मायाजालातही मी रमून जात असे. पुढे कळलं की होऊन गेलेल्या घटनांच्या संदर्भात ‘जर’ ‘तर’ ला अर्थ नसतो. जे घडले ते पूर्णतः स्वीकारून पुढे जायचे असते.
युधिष्ठिर हा ज्येष्ठ पांडव. या ज्येष्ठत्वामुळे त्याला महत्त्व आले. भलाबुरा, योग्यायोग्य निर्णय सर्वांसाठी व सर्वांच्या वतीने घेणे हा अधिकार त्याला ज्येष्ठत्वामुळे मिळाला. द्यूत व अनुद्युत यांचे आवाहन स्वीकारणे हा त्याने घेतलेला निर्णय होता आणि या निर्णयाला बंधूवर्गाची संमती घेणे त्याला आवश्यक वाटले नव्हते.
अर्जुनाने मत्स्यभेदाचा पण जिंकला. म्हणजे पणाला लावलेली याज्ञसेनीही जिंकली. मग मात्र युधिष्ठिराला त्याचे ज्येष्ठत्व आठवले. तो ‘माम अपि दारा कर्तव्या’ म्हणाला. त्याचे लग्र होण्यापूर्वी अर्जुनाचे लग्न होते म्हणजे काय? अर्जुन परिवेत्ता ठरला असता.
पण आपलेही अजून लग्न व्हायचे आहे हे युधिष्ठिराला हिडिंबा राक्षसी भीमावर अनुरक्त झाली तेव्हा आठवले नाही. ‘मला तुझा हा पुत्र दे’ असं हिडिंबा म्हणाली तर तेव्हा हा गप्प राहिला. ‘माम अपि विवाहो कर्तव्यः’ असे हा म्हणता तर हिडिंबेशी गाठ होती. म्हणजे आपल्या ज्येष्ठत्वाचा तो सोईनुसार उपयोग करून घेण्याएवढा व्यवहारचतुर होता.
खांडवप्रस्थ मिळाले तर हा राजा झाला.
भीमार्जुनांनी दिग्विजय केले त्या जोरावर याने यज्ञ केला.
वनवास शक्य व सुसह्य झाला तो देखील भीमार्जुनांच्या बळामुळे.
कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध भीमार्जुनांनी जिंकले. शेवटी अठराव्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला निक्षून सांगितले, ‘आतापर्यंत या युद्धात तू काहीही केलेले नाहीस. आता निदान शल्यवध तरी तू कर. युद्ध आता संपल्यात जमा आहे.’
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.