Devala Ritayar Karave Kay ? (देवाला रिटायर करावे काय ?)-Shyamsundar Mule Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹175.00.Current price is: ₹158.00.

Author           :  Shyamsundar Mule  

Edition          :   1 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   2362

Publisher      :   Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Devala Ritayar Karave Kay ? (देवाला रिटायर करावे काय ?)-Shyamsundar Mule Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

लेखकाचे मनोगत

“देवाला रिटायर करावे काय?’ या माझ्या पुस्तकात इ.स. २००७ ते इ.स. २०११ या चारपाच वर्षांत निरनिराळ्या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह आहे. यातील बरेचसे लेख त्या त्या वेळी गाजलेले आहेत. लेख प्रसिद्ध होताच अनेकांनी फोन केले. पत्रे लिहिली, काहींनी अभिनंदन केले तर कांहींनी आपले आक्षेप नोंदवले, ज्यांनी शंका प्रदर्शित केल्या त्यांच्या शंकाचे निरसन करण्याचा वेळोवेळी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

या संग्रहातील पहिला लेख ‘केवळ कायद्याने अंधश्रद्धा निर्मूलन होईल काय? हा आहे. हा लेख मी जेव्हा लिहिला तेव्हा महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होण्याचे घाटत होते. त्यावेळी ‘केवळ कायद्याने अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही,’ असे मी माझे मत मांडले होते, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याची गरज नही. समाजप्रबोधन हाच त्यावर एकमेव उपाय आहे.’ असे मी म्हटले होते. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा जे आग्रह धरतात त्यांना प्रामुख्याने श्रद्धेचेच निर्मूलन करायचे असते. श्रद्धा आणि मेधा म्हणजे बुद्धी या दोन चाकांवर मानवी जीवनाचा रथ चालत असतो. या दोघींच्या समन्वयाने जीवन प्रगत होत असते. अर्थात श्रद्धा डोळस असावी आणि बुद्धी विवेकी असावी याबद्दल वाद असण्याचे कारण नाही. परंतु अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय? त्याची व्याख्या विवेकाने व्हावयास हवी. केवळ आपण देव मानत नाही, धर्म मानत नाही म्हणून देवधर्म मानणाऱ्यांना अंधश्रद्ध व प्रतिगामी ठरवणे हे पुरोगामी वर्तन नसून बेलगाम वृत्तीचे उच्छृंखल वर्तन आहे. कारण ईश्वर आहे किंवा नाही हे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे माणसाची बुद्धी निषेधात्मक नसावी तर ती विधायक किंवा भावनात्मक असावी. संतांनी श्रद्धा आणि बुद्धी या दोन्हींचा योग्य समन्वय साधला होता. त्यांनी एकीकडे ईश्वराची भक्ती केली तर दुसरीकडे समाजातील अनिष्ट रूढीवर प्रहार करावयासही मागेपुढे पाहिले नाही, संत हेसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रवर्तकच होते. पण त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन आणि अलीकडे कायदा करायला निघालेल्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत असताना संतांनी डोळस श्रद्धा वृद्धिंगत करण्याचे महान

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.