Balivansh-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (बळीवंश)

Original price was: ₹550.00.Current price is: ₹468.00.

Author           : A. H. Salunkhe 

Edition          : 2 ed 2024

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9789384091934

Publisher      : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Balivansh-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (बळीवंश)

बळीवंश

मनोगत

‘बळीवंश’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. अर्थात, हा आनंद व्यक्त करताना मनात एक खंतही आहे. हे पुस्तक माझ्‌या हातून किमान दहा वर्षापूर्वी पूर्ण व्हायला हवे होते. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे लेखन लांबणीवर पडत गेले, तरीही वाचकांनी पुनः पुन्हा केलेल्या विचारणेमुळे आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे कार्य अखेरीस मी पूर्ण करू शकलो, याचे समाधान आहे.

डोक्यात अजून बरेच काही शिल्लक आहे. ते मांडण्याची इच्छाही आहे. तरीदेखील मानवी कार्यक्षमतेला आणि आयुष्याला निसगनिच मर्यादा घातल्या आहेत, हे काही आपण विसरू शकत नाही, त्यामुळे, माझ्या डोक्यात जे काही विचार आहेत, ते सर्वच मांडून होण्याची शक्यता नाही.

प्रस्तुत पुस्तकात देखील अजून बराच भाग समाविष्ट करायला हवा होता. पण व्यावहारिक कारणांनी पुस्तकाच्या विस्तारावर मर्यादा घालावी लागली. विशेषतः, जनसमूह, प्रारंभीचे संघर्ष, विचारवंश, पराभवाची कारणे, केरळमधील बळीविषयीचे प्रेम इ. विषयांवर अजून बरेच लिहिणे आवश्यक होते. परंतु यातील प्रत्येक विषय एक-एक स्वतंत्र पुस्तक लिहिण्याइतका व्यापक असल्यामुळे प्रस्तुत पुस्तकात या विषयांची केवळ ओझरती मांडणी केली आहे. जो अगदी महत्त्वाचा भाग या पुस्तकात समाविष्ट करता आला नाही, तो पुन्हा केव्हा तरी एखाद्या पुस्तकात, बहुधा ‘असुरायण या नावाने, स्वतंत्रपणे मांडण्याचा प्रयत्न करीन. तथापि, मी त्याला अग्रक्रम देणार नाही. कारण, त्यापूर्वी एका पुस्तकाचे लेखन पूर्ण केलेच पाहिजे, अशी तीव्र ओढ माझ्या मनात आहे. ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्ध’ हे ते पुस्तक होय. मला वाचकांचे नेहमीसारखे पाठबळ मिळेल आणि त्यामुळे या पुस्तकाच्या लेखनाचे कार्यही माझ्या हातून लौकरच पूर्ण होईल, असा माझा विश्वास आहे.

बळीवंशातील व्यक्तींच्या कथा बहुतेकांना स्थूलमानाने का होईना ठाऊक असतातच. तरीही, या कथांचे सर्वसामान्य लोकांना अगदी सुपरिचित असणारे काही भागही माझ्या प्रस्तुत पुस्तकात मी नोंदविले आहेत. त्यामुळे, यात नवीन काय, असा प्रश्न काही वाचक उपस्थित करू शकतील. या बाबतीत दोन-तीन गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे, असे नम्रपणे सांगावेसे वाटते. लोकांना काही भाग अगदी सुपरिचित आहेत, एवढ्या कारणाने ते प्रस्तुत पुस्तकातून वगळले असते, तर सर्व विवेचनाला एक प्रकारचा तुटकपणा आला असता आणि अशा विवेचनातून बळीवंशाचे सलग चित्र रेखाटले जाण्याऐवजी त्याची एक खंडित प्रतिमा वाचकांपुढे ठेवल्यासारखे झाले असते. तसे होऊ नये, एवढ्यासाठी या कथांचे अतिप्रसिद्ध भागही नोंदवणे अपरिहार्य झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या कथा विविध माध्यमांतून लोकांपुढे येतात, तेव्हा सामान्यतः मूळ संस्कृत ग्रंथांतील त्यांचे सर्व बारकावे त्यांच्यापुढे मांडण्यात आलेले नसतातः मला त्या कथा नोंदवताना असे बारकावे टाखवून देणे शक्य झाले आहे. तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रस्थापितांनी अनेक महान व्यक्तींच्या कथा लिहिताना खोटेपणा केला आहे, त्या व्यक्तींची बदनामी करण्यासाठी त्यांच्या चरित्रांचे विकृतीकरण केले आहे. ही सगळी प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी प्रस्थापितांचे पक्षपाती दृष्टिकोण बाजूला सारणे आवश्यक होते. त्या व्यक्तींच्या चरित्रांचे वस्तुनिष्ठ आकलन होण्यासाठी एक सम्यक असा नवीन अन्वयार्थ लोकांपुढे ठेवण्याची गरज होती.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.