Ashi Bhetat Raha Tu-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (अशी भेटत रहा तू)
₹60.00
Author : A. H. Salunkhe
Edition : 1 ed 2020
Language : Marathi
ISBN : 9789384091163
Publisher : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ashi Bhetat Raha Tu-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (अशी भेटत रहा तू)
कसा वेदनेने केला माझ्या उरात प्रवास आणि भोगला मी कसा माझा एक एक श्वास
तटस्थ जे असतील त्यांनी पहावा दुरून तटस्थता न सोडता थोडे आत्मीय होऊन
माझ्या आत्मीय जनांनी हृदी क्षमा बाळगून आत्मीयता न सोडता
थोडे अलिप्त होऊन
मनोगत
‘अशी भेटत रहा तू’ या शीर्षकाने काही लिहिलं आहे उचित आहे की नाही याची मला नाही गंभीर स्वरूपार्थ वैचारिक लेखन करणारा अशाप्रकारे आपल्या व्यक्तिगत भासतो. अातिक मत असू शकते. अशा प्रकारचं मत बाळगणाऱ्याचा अनादर करावाधी माझी भूमिका नाही.
तथापि, हे लेखन होणं ही माझी एक मोती मानसिक रो मात्र खरं आहे. कारण. या लेखनातील व्यक्तिगत मात्नांना व्यक्तिपलीकडचा काही आशयही आहे. वरवर पाहता मी हे सगळ स्वतःच्या पत्नीविषयी स्मृतिशेष मधुविषयी लिहिल्यासारखं वाटत असलं, तरी वस्तुतः ते माझ्या सर्व धडपडीला पाठबळ देणाऱ्या प्रेरणेविषयी आहे. ही प्रेरणा माझ्या पत्नीच्या स्वरूपात आहे. इतकंच.
मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत मी जी काही थोडीशी वाटचाल केली. तो करताना एका बाजूनं माझे वाचक श्रोते चाहते माझ्या पत्नीखेरीज इतर कुटुंबीय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि उभे आहेत, हे मी कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे माझ्या पडपडीचं मोठं श्रेय या सर्वांना आहेच. दुसन्या बाजूनं माझ्या पत्नीनं अपार कष्ट करून आणि प्रचंड त्रास सोसून मला साथ दिली होती
स्वाभाविकच, चळवळीला माझं जर आणि जे अल्प-स्वल्प योगदान असेल, तर त्याचं श्रेय तिलाही आहे. लोक जेव्हा आ. ह. साळुंखे या व्यक्तीला काही श्रेय देतात, त्याच्याविषयी अपार जिव्हाळा व्यक्त करतात, तेव्हा ते श्रेय मधुश्री आह’ यांचं संयुक्त श्रेय आहे, हे नोंदवलं जावं, अशी तीव्र इच्छा माझ्या अंतःकरणात असते.
२५ एप्रिल २००० रोजी कर्करोगानं तिचं निधन झालं असलं, तरी त्यानंतरचं माझं लेखनही मी एकट्यान केलेलं नाही, स्मृतिरूपानं का होईना ती आजही मला बळ देत असतेच, अशी माझी भावना आहे अर्थात, भावनिक दृष्टीनं हे कितीही खरं असलं, तरी रक्तामांसाच्या देहानं ती अजूनही माझ्या सोबत असती, तर मला यापेक्षा अधिक काही करता आलं असतं, असं मात्र सातत्यानं वाटत राहतं, हे वाटणं अत्यंत अनावर झाल्यामुळंच माझ्याकडून तिच्याविषयी ‘अशी भेटत रहा तू’ लिहिलं गेलं आहे.
या लेखनात बऱ्याच, किंबहुना बहुतेक, ठिकाणी निराशेसारख्या नकारात्मक आणि प्रसंगों परस्परविसंगत भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावना म्हणजे विशिष्ट क्षणी उत्कटतेनं निर्माण झालेल्या ऊर्मी आहेत इतकंच. त्या ऊमर्मीमधून माझी कर्तव्यभावना कायमची वाहून जाणं मधुश्रीलाही आवडलं नसतं आणि मोही तसं कदापि घडू देणार नाही.
आपल्या सामाजिक, सांस्कृतिक वगैरे जीवनातील गुलामगिरी मला खुपत आली, याचा अर्थ माझं मन काही प्रमाणात संवेदनशील असलं पाहिजे, असं स्वतःविषयी मी नम्रपणानं म्हणू शकेन. अशा प्रकारच्या संवेदनेचा मार्ग हा वेदनेचाच असतो. आता, माझी ही वेदनादायक संवेदना जपण्यासाठी जिनं स्वतः खूप वेदना सोसल्या, तिच्याविषयी माझं मन हळवं असलं, संवेदनशील असलं, तर आपण ते समजून घेऊ राफाल, असा माझा विश्वास आहे.
आ.ह.साळुंखे
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.