

Aadhunik Maharashtracha Itihas aani Samajsudharak Vitthal Pungale
₹300.00 Original price was: ₹300.00.₹210.00Current price is: ₹210.00.
Author : Vitthal Pungale / विठ्ठल पुंगळे
Edition : 5 th- 2023
Language : Marathi
Publisher : Vedika Publication वेदिका पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Aadhunik Maharashtracha Itihas aani Samajsudharak Vitthal Pungale आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक
लेखक : विठ्ठल पुंगळे प्रकाशन : वेदिका पब्लिकेशन
दोन शब्द…
मित्रांनो
मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जितका शौर्य, धैर्य, संयम, संयत आणि रोचक आहे तितकाच आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील घटनाही विविध भाव-भावनांच्या छटांनी भरलेला आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहीलेले आहे. यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्राचा संबंध लागतो. भारताचा राष्ट्रीय इतिहास अभ्यासतांना आपल्याला प्रादेशिक इतिहास विसरून चालणार नाही. महाराष्ट्रातील प्रबोधन, सामाजिक व धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय परिवर्तन यांतून मोठी कार्यशक्ती मिळालेली आहे. महाराष्ट्रात घडून गेलेल्या सामाजिक- धार्मिक प्रबोधन, कामगार शेतकरी चळवळ
आणि सांस्कृतिक बदल यांचाही अभ्यास या दृष्टीने करता येईल.. इंग्रजांनी मराठा सत्तेचा पराभव करून आपले केवळ राजकीय प्रभुत्वच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतीक व आर्थिक कल्पनाही त्यांनी येथील लोकांवर लादल्या त्या विरोधात येथील रामोशी, भिल्ल, कोळी, बेरड या जमाती बरोबरच इतर क्रांतीकारक आणि राजकीय नेत्यांनी इंग्रज विरोधात स्वातंत्र्य लढयात उतरले. स्वातंत्र्याचे देखणे स्वप्न त्यांनी उरात बाळगले व स्वतःचे आजीवन देश सेवेत व्यथीत केले. “देखणी ती पाऊले जी ध्यासची चालती वाळवंटातूनसुद्धा स्वस्तीपत्रे रेखीती ” त्या बोर समाजसुधारकांचे महान कार्य
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक या पुस्तक रूपात मांडले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांगाने पुरोगामी राज्य
आहे. अनेक परिवर्तनातून त्याची निर्मिती झाली आहे. या परिवर्तनाच्या संदर्भाची पाळेमुळे संत चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या
(यापर्यंत येऊन भिडतात, महाराष्ट्रात हळूहळू राष्ट्रवादाचा उदय होऊ लागला, जनमत बनू लागले, लोकांमध्ये जनजागृती वाढली
त्यातून राष्ट्रीय चळवळीला गती मिळाली. रा. गो. भांडारकरांच्या मते जी गोष्ट व्यक्तीची तीच देशाची खरी उन्नती व्हायची असेल
तर प्रथम उच्च धर्माचा प्रसार झाला पाहिजे त्यासाठी प्रथम आत्म्याचीच उन्नती झाली पाहीजे.
समाज, धर्म, राजकारण यात होणारे बदल व त्या बदलाचा परिणाम आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक या पुस्तकाव्दारे अभ्यासता येतो. आजच्या राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्या घटनांचा मागोवा या अल्पशा प्रयत्नाने सफल करण्याचा अट्टाहास केला आहे.
वैदिका पक्सिकेशन, औरंगाबाद
विठ्ठल पुंगळे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.