

आपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00.
Author : कर्नल (निवृत्त) पी. पी. मराळे , प्रा. व्ही. जे. गोडबोले
Edition : 2005
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
आपत्ती व्यवस्थापन
संकल्पना आणि कृती
कर्नल (निवृत्त) पी. पी. मराळे
प्रा. व्ही. जे. गोडबोले
जे आपत्तीच्या खाईत लोटले गेलेले आहेत तेच आणि केवळ तेच मदतीचे मोल जाणू शकतात. मदतीमुळेच ते सुरक्षित राहू शकतात. आपला जीव वाचवू शकतात. सुदैवाने आज मदतीसाठी धावून जाणाऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. मागील पाच दशकांत लोकसंख्येत झालेली वाढ, आपत्तीच्या प्रमाणात आणि तीव्रतेत झालेली वाढ अशी कारणे यामागे असू शकतील. परंतु ठळकपणे जाणवते ते म्हणजे प्रसिद्धी माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या वृत्तांमुळे, दूरचित्रवाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमुळे कधी नव्हे ती आपत्तीविषयक जागरूकता वेगाने वाढली आहे. इतकेच नव्हे तर आज देशादेशांच्या सीमा ओलांडूनही लोक आपदग्रस्तांना भरघोस मदत करत आहेत. एकात्म मानवता यापेक्षा वेगळी ती काय असते ?
एक विरोधाभास मात्र जाणवतो. ज्यांना आपत्ती निवारणाविषयी सैद्धांतिक ज्ञान आहे, इतरांना मार्गदर्शन करण्याची ज्यांची क्षमता आहे, असे लोक प्रत्यक्ष आपत्ती निवारणाच्या कार्यात क्वचितच सहभागी होतात. उलट प्रत्यक्ष मदतीसाठी जे धावून जातात, त्यांना त्याविषयीची नेमकी माहिती नसते. अनुभवही नसतो. साहजिकच आपत्ती निवारणाचे कार्य विस्कळीत होते, वरवरचे होते. अपेक्षित यश मिळाले नाही की समाजही त्यापासून अलिप्त होत जातो. सुदैवाने भारत सरकार हे दोष दूर करण्यासाठी भरीव स्वरूपाची पावले उचलत आहे. एक मात्र खरे की, हे काम तसे सोपे नाही व त्याविषयी सर्वांगीण स्वरूपाचा विचार व्हायला हवा. त्याच्याशी संबंधित अशा सर्व घटकांचा समन्वय व्हायला हवा. या पुस्तकात या दृष्टीने विचार करण्यात आलेला आहे. समाजातील विविध घटक सर्वसामान्य व्यक्ती, गृहसंकुलातील रहिवासी, औद्योगिक कर्मचारी, प्रशासन यंत्रणा या सर्वांना आपत्ती निवारण कार्यात कशा प्रकारे सहभागी होता येईल, याचे विवेचन केलेले आहे. आपत्ती निवारण हे अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे. ते कोणाच्याही लहरीनुसार, राजकीय नेत्यांच्या सोयीनुसार होता कामा नये. आपत्तीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. निवारणाचे कार्य पद्धतशीरपणे, एकजुटीने करणे हेच त्यासाठीचे नेमके उत्तर आहे. त्यात कोणी राजकारण आणू नये की सोयीस्कर अशी सत्ता-समीकरणे जुळवू नयेत. केवळ मूठभर लोकांनाच त्याचा लाभ होऊ नये तर संकटांशी सामना करणाऱ्यानी सामान्यांपर्यंत तो झिरपत जायला हवा, कारण त्यांनाच त्याची खरी गरज आहे
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.