Melelyanchi Gadhi (मेलेल्यांची गढी)-Dostoevsky Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Author : Dostoevsky
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 2041
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Melelyanchi Gadhi (मेलेल्यांची गढी)-Dostoevsky Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
प्रस्तावना
तुरुंगातील आठवणी
दस्तयेवस्कीच का?
समग्र माणूस हाच फ्योदोर दस्तवेवस्कीच्या वाड्मयीन संवेदनशीलतेचा आणि आस्थेचा एकमेव विषय होता. या माणसाचे शारीरिक व मानसिक, भौतिक व अधिभौतिक, तसेच स्वीकृत व विकृत असे दोन्ही टोकांचे विभ्रम दस्तयेवस्कीने त्याच्या कथा, कादंबऱ्या आणि रोजनिशीच्या पानांमधून चितारले. दस्तयेवस्कीचं वाचन करणं म्हणजे घरी कोणी नसतांना आरशात एकटक बघणं आणि त्या प्रतिबिवाने हादरून जाणं.
मनाला शांत करणारा नव्हे तर, झिणझिण्या आणणारा आत्मप्रत्यय हा दस्तयेवस्कीच्या समग्र वाङ्मयातला अंतःप्रवाह आहे. अस्तित्व-वेदना ही त्या प्रवाहाची दिशा आहे. अस्वस्थ प्रचिती ही त्याची अट आहे. म्हणूनच काळ कुठलाही असो, दोस्तोवस्की गैरलागू होण्याची शक्यता कमीच आहे.
दस्तयेवस्कीने आपल्या कादंबऱ्यांमधून मानवी अस्तित्वाचं आर्त जागवल. हे करतांना त्याने मानवी मनाच्या काळ्याशार डोहात सूर मारला. मानवी मनाचा नकाशा ज्ञात्याला कधीच पूर्णपणे ज्ञात होऊ शकत नाही, त्यात काहीतरी कायम अनपेक्षित, असंघटित आणि अतर्क्स वसतं ही दस्तयेवस्कीची ‘वाङ्मयीन भूमिका’ होती, दस्तयेवस्की हा अपुरा नकाशा खिशात घालून जगात वावरला. मनाचे सश्रध्द आणि अश्रद्ध, तार्किक आणि अतार्किक, सामूहिक आणि गुह्य असे द्वंद्वात्मक ताण त्याने आपल्या लेखनात मध्यवर्ती मानले. मनोवैज्ञानिकाला शोभेल अशा बारकाव्याने त्याने वाचकांपुढे मनाच्या पर्यावरणाचा विराट तरीही अपुरा असा नकाशा उलगडवून दाखवला. म्हणूनच जोपर्यंत माणसाच्या कुडीत मन वसेल आणि जोपर्यंत या मनाला सदसद्विवेकाची टोचणी जाणवेल तोपर्यंत दस्तयेवस्की वाचला जाईल.
एकविसाव्या शतकात दस्तयेवस्की का आणि कसा वाचायचा हा प्रश्न शिल्लक उरतोच. याचं कारण प्रकाशवेगाने अवमूल्यन होणारं भोवतालचं सांस्कृतिक पर्यावरण आणि पैसा हे एकमेव मूल्य मानणाऱ्या अर्थवाद्यांचा बेबंद मूल्यविध्वंस, सांस्कृतिकतेचा समूळ उच्छेद करून त्या जागी ‘केवल अर्थवादाची’ प्रतिष्ठापना करणाऱ्या या विमुक्त अर्थव्यवस्थेत ‘मनाची टोचणी’ ही संकल्पनाच हास्यास्पद ठरत चाललीय. दस्तयेवस्कीचे वाङ्मय यावर उत्तम उतारा ठरू शकतो.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.