Nildhaval Dhvajakhali (निलधवल ध्वजाखाली)-Ravi Paranjape Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Author : Ravi Paranjape
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 2178
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nildhaval Dhvajakhali (निलधवल ध्वजाखाली)-Ravi Paranjape Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
प्रस्तावना
सुविख्यात चित्रकार श्री. रवी परांजपे यांनी लिहिलेल्या ‘नील-धवल ध्वजाखाली’ नामक पुस्तकाला प्रस्तुत प्रस्तावना लिहिताना माझ्या मनात विलक्षण संकोचाची भावना आहे. प्रतिभासंपन्न कलादृष्टी, या दृष्टीतून राष्ट्रजीवनाचे अध्ययन करण्याची भूमिका आणि कुंचला तद्वत लेखणी अशा दोन्ही माध्यमांतून लीलया प्रकटणारी प्रभावी शैली या पैलूमुळे माननीय रवी परांजपे तुम्हा-आम्हाला परिचित आहेत. त्यांना नुकताच ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ च्या वतीने मानाचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे. तेव्हा अशा श्रेष्ठ अभिजनाच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिणे म्हणजे अनमोल शालीला दळभद्री ठिगळ लावण्यासारखे ठरेल याची मला जाणीव आहे. तरीही मी प्रस्तावना लिहिण्यासाठी उद्युक्त झालो आहे याची तीन कारणे आहेत. एकतर ‘नील-धवल ध्वजाखाली’ हे पुस्तक अतिशय उचित पृष्ठभूमीवर प्रकाशित होत आहे. वेगळ्या शब्दांत या पुस्तकाचे प्रकाशन निःसंशय समयोचित आहे असे मला वाटते. दुसरे म्हणजे या पुस्तकात श्रीयुत रवी परांजपे यांनी वर्तमानाचे केलेले विश्लेषण मला सर्वार्थाने प्रशंसनीय वाटते. आणखी एका कारणाचा उल्लेख केला पाहिजे. या पुस्तकात निरनिराळ्या संदर्भात श्रेष्ठ नेत्यांच्या, विचारवंतांच्या अवतरणांची उत्कट आठवण होते. म्हणजेच सहजपणे सुखद साधर्म्यस्थळे पुस्तकात आढळतात. हा पैलू तर निखालस लोभसवाणा आहे. तात्पर्य पुस्तकाचे वाचन करताना माझ्या ज्ञानात व आनंदात भर पडली. म्हणूनच कृतज्ञता बुद्धीने प्रस्तावना लिहिण्याचे मी मान्य केले हे सुरुवातीसच नमूद करीत आहे.
श्रीयुत रवी परांजपे यांनी भारताच्या राष्ट्रजीवनाची केलेली मीमांसा आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे म्हणजे ‘इंग्रजाळलेल्या’ आपल्या बुद्धिजीवींकडून झालेली मीमांसा यांत निश्चितच मौलिक अंतर आहे. या बुद्धिजीवींनी पश्चिमी प्रतिमानाच्या आकर्षणातून भारतातही उदयास आलेले राष्ट्रजीवन अर्वाचीन आहे, परक्या राजवटीशी जो संघर्ष झाला त्यांतून उद्भवले आहे; आणि राजसत्तेतच या राष्ट्राच्या जन्माची व विकासाची बीजे आहेत असे निष्कर्ष काढले आहेत. श्रीयुत रवी परांजपे मात्र असे मानतात की भारतात अतिशय प्राचीन काळापासून राष्ट्रजीवन नांदत आहे,
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.