Pradakshina Khand Dusara
प्रदक्षिणा : खंड २
‘प्रदक्षिणे’च्या पहिल्या खंडात स्थूलपणे, ब्रिटिश राजवटीत जी ‘अर्वाचीन’ मराठी साहित्याची निर्मिती झाली तिचा धावता आढावा आलेला आहे.
प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या अर्धशतकात, मराठी साहित्याचा जो विस्तार आणि विकास झाला त्याचा मागोवा, वाङ्मय प्रकारानुसार घेतला आहे. या काळात सारे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण पार पालटले, पालटतच गेले. या बदलांत नवकथा, नवकविता, वास्वववादी नाटक, एकांकिका, ऐतिहासिक कादंबरी, आस्तित्त्ववाद, दलित साहित्य, ग्रामीण कथा, आत्मचरित्रे, गझलरचना, स्त्रीवादी साहित्य अशा अनेक नवनव्या आविष्कारातून मराठी साहित्याचा फार मोठा विस्तार झाला. नव्या महाराष्ट्र राज्यात साहित्याचे नवे मानदंडही निर्माण झाले. संपूर्ण भारताच्याच पटावर गौरवास्पद ठरावी अशी विविधरंगी कामगिरी मराठी साहित्याने केली. तिचा धावता परंतु नीटस मागोवा, जाणकार अभ्यासकांनी प्रस्तुत ठिकाणी घेतला आहे. तो मराठी वाचकांना आवडताना, संग्राह्य वाटताना दिसत आहे.
Reviews
There are no reviews yet.