Vidhimandlatun N. D. Mahanor | विधिमंडळातुन ना.धों.महानोर
ना. धों. महानोर यांना उभा महाराष्ट्र रानकवी म्हणून ओळखतो; पण महानोर म्हणजे केवळ स्वतःच्या शेतीत अन् स्वतःच्यात कवितेत रमलेला माणूस नव्हे! शेती आणि साहित्य या दोन्ही बाबतींत त्यांनी सार्वजनिकरीत्या सतत जागल्याची भूमिका निभावली आहे.
राज्यपालांचे नामनियुक्त सदस्य म्हणून दोन वेळा विधान परिषदेवर काम केलेल्या महानोरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातील शेती-पाण्याशी संबंधित अनेक ज्वलंत विषय ऐरणीवर आणले. विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांची हलाखी संपावी यासाठी सरकारला कित्येक योजना सुचवल्या; कित्येक मंजूर करून घेतल्या. स्वतः शेतीत प्रयोग करून ते राज्यभरात राबवले जावेत यासाठी पाठपुरावा केला. दुसरीकडे, महाराष्ट्राचं साहित्य-कलासंपन्न रूप टिकून राहावं यासाठी अखंड धडपड केली. एकूण समाजाचं सांस्कृतिक भरण-पोषण व्हावं, यासाठी अनेक नवनूतन कल्पना मांडल्या आणि सरकारकडून प्रत्यक्षात आणवून घेतल्या.
महानोरांनी आमदार म्हणून विधान परिषदेत
केलेल्या भाषणांचा हा संपादित दस्तावेज.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.